ईव्हीएमवर ९५ टक्के मतदातांचा विश्वास नाही
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाजाच्या प्रवर्गातील स्वयंप्रचेरित सामाजिक कार्यकर्त्यांच्या परिवर्तन संघटनेने बहुजन समाजांच्या गंभीर समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने नुकताच ऑनलाइन सर्वे केला. या सर्वे नुसार ९५% मतदातांना ईव्हीएमवर विश्वास नाही. निष्पक्ष व पारदर्शक निवडणूकीसाठी पारंपारिक मतपत्रिका निवडण्याची इच्छा मतदारांनी व्यक्त केली.ईव्हीएमवर ९५ टक्के मतदातांचा विश्वास नाही
हा सर्वे बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, व भारतीय रिपब्लिकन पक्ष यांना रणनिती आखण्यास हा सर्वे महत्त्वाचा ठरू शकतो. अशी माहिती अॅड. अरूण कुमार डोळस, इनक्राफ्ट टेक्नॉलॉजीज प्रा.लि.चे पंकज जाधव व दत्तात्रय गोरखे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
अॅड. अरूण कुमार डोळस यांनी सांगितले की, यानुसार युतीच्या रणनितीबाबतः वीबीए, बसपा आणि भारिप (आ) पक्षांनी इंडिया गटाबरोबर युती करावी. सर्वेनुसार ६३ टक्यांना वाटते की, वीबीए आणि इंडिया गटात युती व्हावी. ६२ टक्के सहभागीदारांना बसपा आणि भारत यांच्यात युती अपेक्षित आहे.
बहुजन समाजाच्या मतदारांच्या पसंती बाबतः ४९ टक्के (सर्वोच्च) सहभागीदारांनी सूचित केले की बहुजन समाजाचे प्रतिनिधत्व करणार्या राजकीय पक्षांची एनडीए किंवा इंडिया या दोन गटांपैकी एका बरोबर युती व्हावी. अन्यथा मतदान करताना वीबीए त्यांचा सर्वाधिक पसंतीचा पक्ष असेल. निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेसाठी ईव्हीएमपेक्षा पारंपारिक मतपत्रिका निवडण्याची इच्छा आहे.
एकतेच्या निर्मितीतील ६१ टक्के सहभागीदारांना वाटते की महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीत VBA आणि BSP एका पक्षात एकत्र येऊ शकतात. ५९ टक्के सहभागीदारांनी VBA व भा.रि.प (आ) यांच्यात ऐक्य होण्याची इच्छा व्यक्त केली. ५४ टक्के सहभागीदाराना बसपा, वीबीए आणि भारिप (आ) हे तिन्ही प्रमुख पक्ष, सध्या एकत्रित येण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. तर ६० टक्के सहभागीदारांना बसपा आणि भारिप (आ) यांच्यात ऐक्याची शक्यता दिसत नाही.
एकतेच्या निर्मितीतील या सर्वेक्षणात नेत्यांचा अहंकार (२५%) स्वार्थ (२३%) आणि परस्पर विश्वासाचा अभाव (१५%) हे अडथळे दूर केले तर समाजाचे प्रतिनिधित्व करणार्या पक्षांचे एकत्रीकरण शक्य होईल.
बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणार्या राजकीय पक्षांमधील ऐक्याबाबतः सर्वेतील ५५ टक्क्यांचा विश्वास आहे की बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणारे सर्व राजकीय पक्ष त्यांच्यात ऐतिहासिक मतभेद आहेत. त्यांना एकत्रित करण्याचे भूतकाळातील प्रयत्न अयशस्वी होऊनही एकत्र येऊ शकतात. तरूण म्हणजे ३८ वर्षे वयापर्यंतच्या ६५ टक्के स्त्रिया आणि ६२ टक्के पुरूष एकजूट होण्याविषयी अधिक आशावादी आहेत. ७७ टक्क्यांना मोठ्या गटाला या पक्षांनी एकत्र येऊन मजबूत राजकीय पक्ष उभारावा असं मत व्यक्त केल आहे.
राजकीय पटला बाबतः यात असे दिसते की बहुजन समाज भारताच्या लोकसंख्येच्या ८० टक्के पेक्षा अधिक आहे.
![ईव्हीएमवर ९५ टक्के मतदातांचा विश्वास नाही](https://www.smartpunekarnews.com/wp-content/uploads/2024/04/WhatsApp-Image-2024-04-10-at-4.17.17-PM-1024x463.jpeg)
सर्वे संदर्भात विस्तृत माहितीः
बहुजन समाजाच्या एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील स्वयंप्रेरित सामाजिक कार्यकर्त्यांच्या परिवर्तन या अनौपचारिक संघटनेने केलेला हा सर्वे आहे. १४ फेब्रुवारी ते २४ मार्च या कालावधित चाललेल्या सर्वेत बहुजन समाजातील १०२३ महाराष्ट्रीयन व्यक्तींनी प्रतिसाद दिला. या सर्वेत ५ विभागात ५० प्रश्न विचारण्यात आले.